'’लव जिहाद’ साठी खासगी विधेयक मांडून कायदा करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे करणार आहे: भाजपा खासदार अनिल बोंडे

 



राज्यात सध्या ‘लव जिहाद’ची प्रकरणं मोठ्या प्रमाणात बाहेर येत असून यासंदर्भात येत्या अधिवेशनात विधेयक आणणार असल्याची माहिती भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी दिली आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी यादसंदर्भात प्रतिक्रिया दिली. तसेच आंतरधर्मीय विवाह कायद्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

“’लव जिहाद’ हे एक सुनियोजित कटकारस्थान आहे. अमरावतीतल्या उमेश कोल्हे हत्याकांडनंतर ज्या आरोपीला पडकण्यात आले, त्याचाही लव जिहाद प्रकरणात हात होता, हे सिद्ध झाले आहे. मेळघाटातल्या आदिवासी मुलींना फसवून पळवून आणल्या जाते. जर मुलींनी विरोध केला तर मुलींना जीवही गमवावा लागतो. अशीच एक घटना चिखलदरा तालुक्यातही समोर आली आहे. हे मुलं महाविद्यालयासमोर उभे राहुन मुलींवर लक्ष ठेवतात. तसेच फेसबुकच्या माध्यामातून मुलींशी संपर्क केला जातो. हे सर्व सुनियोजितपणे सुरू असते”, असा आरोप अनिल बोंडे यांनी केला आहे.

“’लव जिहाद’ संदर्भात मी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. तसेच मी येत्या अधिवेशनात याबाबत खासगी विधेयक मांडून कायदा करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे करणार आहे. याबरोबरच आंतरधर्मीय विवाह कायद्यात सुधारणा करण्याची गरज आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या