प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

पांढऱ्या कावळ्याबद्दल ग्रामीण भागामध्ये अनेक गैरसमज आहेत. पांढरा कावळा दिसल्यानंतर दुष्काळ पडतो, असे ग्रामीण भागात म्हटले जाते. परंतु हा गैरसमज असल्याचे निसर्गाने आत्तापर्यंत सिद्ध केले आहे. या अगोदर 9 वर्षापूर्वी शिरूरकासार शहरात असाच पांढरा कावळा आढळून आला होता. त्यावेळी मोठे कुतूहल वाटले होते.
Milanin रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे असे प्राणी जन्मास येतात. किंवा अनुवंशिकतेमुळे. माता पिता जर रंगहिन असतील तर त्यांच्या कडून जन्मास येणाऱ्या पुढची पिढी २५ टक्के Albinism चे Gens पुढच्या पिढीकडे आलेले असतात. पांढरा कावळा जन्मास येण्याचे हे कारण असते. असे बरेच प्राणी जन्मास येतात.
“शिरूरमध्ये आढळलेला पांढरा कावळा हा साधारण दीड महिन्याचा असावा. त्याच्या डावा पाय थोडा कमकुवत असल्याने त्यास उडण्यास थोडा त्रास होत आहे. जर त्याला चांगली भरारी घेता नाही आली तर त्यास पकडून सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात उपचारासाठी आणले जाईल. सध्या हा कावळा निसर्गात मुक्त असून लवकरच तो बरा होऊन निसर्गात मुक्त संचार करील अशी आशा आहे .”
