प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील विष्णू इथापे यांची निवड भाजपच्या कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आल्याने त्याच्यावर परिसरातून शुभेच्छा वर्षाव होताना दिसत आहे.
समाजहिताचा वसा घेऊन सर्व सामान्य नागरिकांसाठी अहोरात्र उभे राहणारे तसेच त्यांच्याकडे असलेले कुशल संघटन नेतृत्व या सर्व गोष्टी लक्षात घेऊन राज्याचे माजी मंत्री विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या आदेशाने भाजपचे तालुका अध्यक्ष संदीप नागवडे यांनी तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील विष्णू इथापे यांची निवड भाजपच्या कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र माऊली निवासस्थान या ठिकाणी देण्यात आले. त्यांच्या निवडीनंतर तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छा वर्षाव होताना दिसत होता.