आठवडे बाजार पूर्वीच्या ठिकाणी : भाजपाच्या आंदोलनास प्रतिसाद


कर्जत 

येथील आठवडे बाजार पुन्हा एकदा मुख्य बाजारपेठेत भरविण्यात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना यश आले असून व्यापारीसह नागरिकानी देखील यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. बाजार मुख्य पेठेत भरला जावा सगळ्यांची इच्छा होती याबाबत कोणत्याही अधिकाऱ्यांचा अरेरावीपना भाजपा सहन करणार नाही अशी प्रतिक्रिया भाजप युवा मोर्चाचे विनोद दळवी यांनी दिली. याबाबत राष्ट्रवादी महिला आघाडीच्या नगरसेविका मनीषा सोनामाळी यांनी देखील पत्रकाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. 

सोमवारचा कर्जतचा आठवडे बाजार अनेक वर्षांपासून मुख्य बाजारपेठेत भरवला जात होता. सर्वांसाठी हा बाजार सोयीस्कर ठरत असताना अचानक मागील वर्षी कोरोना पार्श्वभूमीवर सामाजिक अंतरपथ्य अनुषंगाने दादा पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात कर्जत नगरपंचायतीने भरविण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षीपासून हा बाजार अहमदनगर-बारामती मार्गावरच सुरू राहीला. बाजार पटांगणात भरत असल्याने गावातील मुख्य बाजारपेठेस याचा मोठा आर्थिक फटका बसत होता. याबाबत अनेक व्यापाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया शासन दरबारी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. मात्र यास यश मिळत नव्हते. सोमवार, दि २५ रोजी भाजपाचे विनोद दळवी, अनिल गदादे, अशोक खेडकर, वैभव शहा, काकासाहेब धांडे, अक्षय क्षीरसागर, स्वप्नील सोनामाळी, आदित्य भोज, राजेंद्र येवले, गणेश शिंदे, मुबीन बागवान यांनी भल्या पहाटे दादा पाटील महाविद्यालयासमोरील पटांगणात ठाण मांडत बाजारविक्रेते, व्यापारी यांच्याशी चर्चा करून आजचा बाजार पहिल्या ठिकाणीच बाजारतळात घ्यावा अशी मागणी लावली. त्यास विक्रेते आणि व्यापारी बांधवांनी सकारात्मक प्रतिसाद देत पूर्वीच्या ठिकाणीच बाजार भरविला गेला. यावेळी नागरिकांनी देखील पूर्वीच्या ठिकाणी बाजार सुरू झाल्याने धन्यवाद व्यक्त केले. बाजार पूर्वीच्या ठिकाणी भरवावा यासाठी नगरसेविका मनीषा सोनमाळी यांनी देखील पाठपुरावा केला होता. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या