फडणवीस हे ड्रग्ज उद्योगाचे मास्टर माइंड

नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप 


मुंबई  

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यानंतर अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी सोमवारी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे.देवेंद्र फडणवीस हे ड्रग्ज उद्योगाचे मास्टर माइंड आहेत, असा खळबळजनक आरोप केला आहे , जयदीप राणा आणि नीरज गुंडेसोबत त्यांचे काय संबंध होते असा सवाल उपस्थित करतानाच याची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणीही  मलिक यांनी केली आहे.

गेले काही दिवस नवाब मलिक एनसीबी संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची राळ उडवून दिली आहे. आज मलिक यांनी विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यावर आरोप केले.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू होता, असा दावा मलिक यांनी केला.फडणवीस हेच मुख्यमंत्री या नात्याने मुंबईतील ड्रग्ज रॅकेटला संरक्षण देत होते. केंद्र सरकारने एक चौकशी समिती नेमून या प्रकरणाचा तपास करावा. लोकांच्या मनात भीती निर्माण व्हावी, यासाठी फडणवीस यांनी शासकीय यंत्रणेचा सर्रास वापर केला,” असा दावा मलिक यांनी केला.निरज गुंडे हे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी काम करतात. गुंडेच्या माध्यमातूनच फडणवीस यांचे मायाजाल चालायचे.फडणवीस सरकारच्या काळात नीरज गुंडे हे देवेंद्र यांचा दूत म्हणून उद्धव ठाकरेंना मांडवलीसाठी भेटायचे,असा दावाही मलिक यांनी केला.

फडणवीस यांचा वजीर याच शहरात राहतो.त्याचे नाव निरीज गुंडे आहे.फडणवीस सरकारच्या काळात त्याला मुख्यमंत्री निवास, मुख्यमंत्री कार्यालयात थेट प्रवेश होता. सर्व पोलिसांच्या बदल्या तो ठरवत होता. महाराष्ट्रात त्याच्याच माध्यमातून वसुली केली जायची,” असा आरोप मलिक यांनी केला.ड्रग्जचा खेळ मुंबई आणि गोव्यात सुरू राहावा म्हणून वानखेडे यांना मुंबईत आणण्यात आले. त्यामागे फडणवीस आहेत. महाराष्ट्रातील सर्व ड्रग्जचा खेळ फडणवीस यांच्या इशाऱ्यावर चालतो,” असा आरोप मलिक यांनी केला.फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी नदी पुनरुज्जीवनाचा संदेश देण्यासाठी गायलेल्या एका गाण्याला जयदीप राणा याने अर्थपुरवठा केला होता. हा राणा ड्रग विक्रेता (पेडलर) आहे, असा आरोप मालिक यांनी केला.ऐन दिवाळीत ड्रग्ज रॅकेट प्रकरणी राजकीय क्षेत्रात आरोप-प्रत्यारोपांची मोठी राळ उडाली आहे.

मुंबई । नवाब मलिक यांनी माझी पत्नी अमृता फडणवीस यांची एक सेल्फी जारी केली, त्यासंदर्भात रिव्हर मार्च या संघटनेने कालच सुस्पष्ट खुलासा केलेला आहे. त्यामुळे नवाब मलिक यांनी लवंगी फटाका फोडला असला तरी दिवाळीनंतर बॉम्ब मी फोडीन.नबाव मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत आणि याचे सर्व पुरावे मी माध्यमांसमोर उघड करीन आणि ते सर्व पुरावे शरद पवार यांना सुद्धा देणार आहे, असा पटलवार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

रिव्हर मार्च या संस्थेने त्यांच्या प्रसार अभियानासाठी एक कटेंट टीम भाडेतत्त्वावर घेतली होती. ‘नदी बचाओ या अभियानाशी माझी पत्नी सुद्धा जोडलेल्या होत्या. त्यावेळी त्या कंटेट टीममधील कर्मचा-यांनी सेल्फी काढल्या होत्या. रिव्हर मार्चसोबत आलेल्या कुणाशीही आमचा संबंध नाही. या लोकांनी माझ्यासोबतही फोटो काढले होते. पण, नवाब मलिक यांनी तो फोटो जाणूनबुजून दिला नाही. माझ्या पत्नीसोबतचा ४ वर्षांपूर्वीचा फोटो दिला. यातूनच त्यांची मानसिकता लक्षात येते.आता अशाच फोटोवरून संबंध जोडायचे असतील तर नवाब मलिक यांचा जावईच ड्रग्ज प्रकरणात सापडला आहे, मग संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस ही ड्रग्ज माफियांची पार्टी म्हटली पाहिजे. पण, मी तसे म्हणणार नाही. नवाब मलिक यांनी दिवाळीपूर्वी लवंगी फटाका फोडला असला तरी दिवाळीनंतर बॉम्ब मीच फोडणार. नबाव मलिक यांचे अंडरवर्ल्डशी कसे संबंध आहेत, याचे सर्व पुरावे मी माध्यमांना आणि शरद पवार यांना देणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

नीरज गुंडे यांच्याबाबत नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांबाबत बोलताना ते म्हणाले की, निरज गुंडे हे माझ्याआधीपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मित्र आहेत. ते दररोज राष्ट्रवादीचेच घोटाळे बाहेर काढतात, त्यामुळे हिंमत असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी. वाझे पाळण्याची सवय त्यांना आहे, आम्हाला नाही.नवाब मलिक यांचा खोटारडेपणा यापूर्वीही उघड झाला आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. जे आजपर्यंत बाहेर आले नाही, ते आता मी बाहेर आणीन. एक मात्र सांगतो की, मी आजवर कधीही विनापुरावे आरोप केले नाहीत आणि आजवर केलेले कोणतेही आरोप मी मागे घेतलेले नाहीत. मै काच कें घर में नही रहता. केवळ आणि केवळ एनसीबी दबावात यावी आणि स्वत:चा जावई सुटावा, यासाठी नबाव मलिक यांचा संपूर्ण आटापिटा सुरू आहे, असेही फडणवीस म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या