ओबीसी आरक्षण पूर्ववत करण्यासाठी

अभासपच्या वतीने रास्तारोको




आळेफाटा  :
अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील रद्द केलेले राजकीय आरक्षण पूर्ववत करावे, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, राज्य मागासवर्ग आयोगाला जनगणना करण्यासाठी राज्य सरकारने त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा आदी मागण्यांसाठी आळेफाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. 
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून बेळगाव या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याच्या झालेल्या विटंबनेचा अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने निषेध करून या आंदोलनास सुरवात करण्यात आली.
यावेळी बोलताना अखिल भारतीय समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ म्हणाले की, राज्य मागासवर्ग आयोगाची  स्थापना होऊन नऊ महिने उलटले मात्र या आयोगास राज्यशासनाने निधी न दिल्यामुळे राज्य मागासवर्गीय आयोगाचे काम चालू होऊ शकले नाही. त्यामुळे न्यायालयात राज्यामध्ये असलेली ओबीसीची आकडेवारी राज्यसरकार 
न्यायालयात देऊ शकले नाही, असे त्यांनी सांगितले. तर जिल्हा अध्यक्ष निलेश भुजबळ यांनी जातनिहाय जनगणना करून आमचं हक्काचं मंडल आयोगाने दिलेले राजकीय आरक्षण आम्हाला मिळाले पाहिजे अशी भावना समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष निलेश भुजबळ यांनी व्यक्त केली.  राज्य शासनाने ताबडतोब राज्य मागासवर्ग आयोगाचे काम चालू केलं नाही तर संपूर्ण राज्यामध्ये रास्ता रोको व चक्काजाम आंदोलने करून संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा संघटनेच्या 
वतीने देण्यात आला. या प्रसंगी आळे गावचे उपसरपंच उदय पाटील भुजबळ, ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष चारुदास साबळे, विशाल महाराज गडगे,अनिल वाघुले, स्वप्नील गडगे,सुभाष वाघोले, रुपेश  भुजबळ , ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सीताराम अभंग ,अशोक गडगे, दत्तात्रय गडगे , नितीन भुजबळ, किशोर कोरडे, मनोज शिंदे ,जालिंदर आहेर, समता परिषदेच्या जिल्हा संघटक दीप्ती भुजबळ लता भुजबळ व अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या