सामनाच्या मुख्य संपादकपदी पुन्हा उद्धव ठाकरे



मुंबई: शिवसेनेचं  मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या मुख्य संपादक पदी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शुक्रवारी विराजमान झाले. मागील आठवड्यात शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 'सामना'च्या मुख्य संपादकपदाची धुरा स्वतःकडे घेतली. राऊत यांचे कार्यकारी संपादक पद मात्र कायम ठेवण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 'दैनिक सामना'च्या संपादकपदापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. मार्च 2020 महिन्यात हे पद उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं. मात्र आता उद्धव ठाकरे हे दैनिक सामनाचे मुख्य संपादक असतील. तर कार्यकारी संपादकपदी संजय राऊत यांचं नाव कायम ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे येत्या काळात 'दैनिक सामना'मधून खुद्द उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजप तसेच इतर विरोधकांवर टीकेचे आसूड ओढले जाण्याची शक्यता आहे.

संजय राऊत यांच्या अटकेनंतर सामनाचे अग्रलेख कोण लिहिणार, रोखठोक सारखं सदर कोण लिहिणार असे प्रश्न उपस्थित झाले होते. मला अग्रलेख लिहायला द्या, अशी मागणी देखील केली होती. पण ते शक्य नसल्याने उद्धव ठाकरे हेच 'सामना'चे मुख्य संपादक झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात विरोधी पक्ष तसंच शिवसेनेच्या बंडखोरांवर सामनाच्या माध्यमातून आसूड अशी शक्यता आहे. शिवसेनेची भूमिका सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त होते. त्यामुळे आता उद्धव ठाकरे सामनाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडण्याचं काम करतील. उद्धव ठाकरे आपल्या लेखणीची जादू कशाप्रकारे दाखवतात हे येत्या काळात समजेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या