विजयादशमीच्या मुहूर्तावर विक्रमी उंचीच्या भगव्या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना


जामखेड 

तालुका खर्डा येथे कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांच्या अनोख्या संकल्पनेतून साकारलेल्या विक्रमी उंचीच्या भगव्या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना आज विजयादशमीच्या मुहूर्तावर करण्यात आली. हा महोत्सव लाखोंच्या उपस्थितीत साधु संत व महंताच्या साक्षीने मोठ्या उत्साहात झाली. वेगवेगळ्या संस्थानचे उत्तराधिकारी संत महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. आखील भारतीय वारकरी संघटनेचे अध्यक्ष हभप प्रकाश महाजन बोधले, शिक्षण क्षेत्रातील तंज्ञ डिजिटल शिक्षक डिसले गुरूजी, राहिबाई पोफळे, मंगला बनसोडे, अनुराधा गोरे, अवधूत गांधी सह मोठ्या संख्येने विद्यमान आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्जत-जामखेडकरांसह अवघ्या राज्यभरातच या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड तालुक्यातील खर्ड्याच्या ऐतिहासिक शिवपट्टण किल्ल्यासमोर ‘स्वराज्य ध्वज प्रतिष्ठापना झाली.

हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ६ जून १६७४ रोजी  झालेल्या राज्याभिषेकाचे स्मरण म्हणून या ध्वजाची उंची ७४ मीटर ठेवण्यात आली आहे. या ध्वजाचा आकार ९६X६४ फूट आहे. ध्वज स्तंभाचे वजन १८ टन असून नुसत्या ध्वजाचे वजन ९० किलो आहे. साडे पंचावन्न हजार चौरस फूट आकार असलेला हा ध्वज देशात सर्वांचे आकर्षण ठरला आहे. ध्वज प्रतिष्ठापना आणि ध्वजारोहणाच्या निमित्ताने या किल्ल्याची डागडुजी केलेली होती.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना आ रोहित पवार म्हणाले की, हा जगातील सर्वात उंच भगवा ध्वज समानतेचा एकतेचे प्रतिक आहे. सामान्य कुटुंबातील असामान्य कर्तृत्व असलेल्या आपले आदर्श असलेल्या मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र करत स्वराज स्थापन केले यामुळे पोलचे वजन अठरा टन ठेवले आहे. हा कार्यक्रम राजकीय नाही सर्वाचा आहे. सर्व जण येथुन प्रेरणा घेऊन जाणार आहोत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व आमदार रोहित पवार यांच्या अनोख्या संकल्पनेतून उतरलेल्या विक्रमी उंचीच्या भगव्या स्वराज्य ध्वजाचा प्रतिष्ठापना सोहळा अहमदनगरच्या खर्डा येथील शिवपट्टण किल्ल्यावर विजयादशमीच्या मुहूर्तावर १५ ऑक्टोबरला सकाळी ९  वा  कार्यक्रमाला सुरुवात झाली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षेपी आणि आदर्श स्वराज्य कारभाराची शिकवण देत स्वराज्य ध्वजाने अवघ्या महिनाभराच्या प्रवासातच प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्यामुळे  लवकरच होणा-या या स्वराज्य ध्वजाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याबाबत राज्यभरात उत्सुकता वाढीस लागली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथील शिवपट्ट्ण किल्ल्यावर होणा-या या भव्य प्रतिष्ठापना व ध्वजारोहण सोहळ्याला राज्यभरातून अनेक माननीय अतिथी उपस्थित होते. आपल्या ७४ मीटर उंचीने नवी ओळख महाराष्ट्राला मिळवून देत जगातील व देशातील सर्वात उंच असा विक्रम प्रस्थापित करणा-या या स्वराज्य ध्वजाच्या प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली.

कर्जतकर – जामखेडकर नागरिक आणि सर्व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधींनी खर्डा किल्ल्याच्या परिसरात स्वच्छता केली आहे. दरम्यान रोहित पवार यांनी स्वत: या सोहळ्याच्या स्थळाची म्हणजे खर्डा भुईकोट किल्ल्याला भेट देऊन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची पाहणी केली आहे. किल्ल्यासमोरच्या पटांगणात हा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारीसह स्वराज्य ध्वज यात्रेचे सहकारी व इतर स्थानिक हे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी उत्सुक होते. युवावर्गाने उत्साहाने या ध्वजारोहणाच्या निमित्ताने होणा-या स्वच्छता तसेच आयोजनात अत्यंत उत्साहाने भाग घेतला होता.

कर्जत-जामखेड तालुक्याला नवी ओळख मिळवून देणारा हा स्वराज्य ध्वज अनेकांसाठी आता आदर्श प्रेरणा बनला आहे. महाराष्ट्राच्या शौर्यशाली परंपरेतून जन्मलेल्या, एकतेची-बंधुत्वाची हाक देणा-या व  ७४ मीटर अशा विक्रमी उंचीने सर्वांच्या मनात भरलेल्या भगव्या स्वराज्य ध्वजाने थोड्याच दिवसात अथक यात्रेकरवी जनमानसात आणि देशभरातही महाराष्ट्राच्या करारी इतिहासाची ओळख पोहोचवण्यात मोठं योगदान दिलं आहे. ३७ दिवसांचा अहोरात्र प्रवास करत, ९६ शक्तीपीठे आणि प्रेरणास्थळांना वंदन करत, महाराष्ट्रातील ३६ जिल्हे व  इतर पाच राज्यांना भेट देऊन पुन्हा राज्यात पोहोचलेला हा भगवा स्वराज्य ध्वज आता कायमच उंच झळकून आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श स्वराज्यधर्माची आठवण करून देत राहाणार आहे.

हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ६ जून १६७४ रोजी  झालेल्या राज्याभिषेकाचे स्मरण म्हणून या ध्वजाची उंची ७४ मीटर ठेवण्यात आली आहे. या ध्वजाचा आकार ९६X६४ फूट आहे. ध्वज स्तंभाचे वजन १८ टन असून नुसत्या ध्वजाचे वजन ९० किलो आहे. साडे पंचावन्न हजार चौरस फूट आकार असलेला हा ध्वज देशात सर्वांचे आकर्षण ठरला आहे. असा हा मंगल ध्वज कर्जत-जामखेडवासियांसाठी सध्या अभिमानाचा विषय आहे. ध्वज प्रतिष्ठापना आणि ध्वजारोहणाच्या निमित्ताने या किल्ल्याची डागडुजी केली जात आहे. या किल्ल्याची निर्मिती सरदार राजे निंबाळकर यांनी १७४३ साली केली होती. इ.स १७९५ मध्ये अहमदनगर जवळ खर्डा या ठिकाणी हैदराबादच्या निजामाला मराठ्यांनी पाणी पाजले. ही अखेरची शौर्यगाथा याच शिवपट्टण किल्ल्याच्या परिसरात लिहिली गेली. हा ऐतिहासिक किल्ला जामखेड जवळ खर्डा या ठिकाणी आजही भरभक्कम अवस्थेत उभा आहे. अभेद्य तटबंदी असणारा हा किल्ला सहा खणखणीत बुरुजांनी संरक्षित आहे. आता येत्या दसऱ्याला अवघ्या राज्याचं नवं स्वप्न असणाऱ्या या भगव्या स्वराज्य ध्वजाची सन्मानाने दिमाखदार प्रतिष्ठापना झाली. यामुळे खर्डा किल्ल्यावर पुन्हा इतिहास रचला गेला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या