हिम्मत असेल.. तर छापा टाकाच

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे केंद्र सरकारला आव्हान


मुंबई प्रतिनिधी 

छापा टाकायचा अन विरोधकांचा काटा काढायचा ही केंद्रातल्या सरकारची नीती आहे. हिम्मत असेल तर त्यांनी छापा टाकावाच, असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात भाजप सरकारला दिले. न झुकण्याची जिद्द आपल्या रगारगात कायम ठेवावी लागेल. ’हर हर महादेव’ हे दिल्लीच्या तख्ताला दाखवण्याची वेळ येऊ नये पण आली तर दाखवावीच लागेल, असेही ठाकरे म्हणाले.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. सरकार पाडण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. हिंमत असेल तर पाडून दाखवा. तसं करून पडत नाही म्हणून छापा-काटा सुरु झाला. छापा टाकायचा आणि काटा काढायचा. ही थेरं जास्त काळ चालू  शकणार नाहीत, असा घणाघात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केला आहे.

लाल बाल आणि पाल, महाराष्ट्र, बंगाल, पंजाब स्वातंत्र्य लढ्यात पुढे होता. बंगाली जनतेने धडा शिकविला त्या बंगाली जनतेचे  आणि ममता दीदींचे अभिनंदन करतो. न झुकण्याची जिद्द आपल्या रगारगात कायम ठेवावी लागेल. हर हर महादेव हे दिल्लीच्या तख्ताला दाखवण्याची वेळ येऊ नये पण आली तर दाखवावीच लागेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या