'समन्यायी'बाबत आम्ही भांडत होतो तेव्हा का गप्प होते? ना. थोरात


संगमनेर

कोरोना संकट असले तरी कालव्यांच्या कामांना निधी कमी पडणार नाही. कालवे होणार आहे. हे त्यांना सहन होत नसल्याने काही बातम्या येतात. त्यांच्या वक्तव्यांना फार महत्व देण्याचे गरज नाही. समन्यायी कायद्याविरोधात आम्ही आंदोलन,मोर्चा काढत होतो, तेव्हा का गप्प होते ? जनतेचे प्रेम सोबत असून आमचा हेतू शुध्द व प्रामाणिक आहे. त्यामुळे संगमनेरला मोठे यश आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखान्याच्या 55 व्या गळित हंगाम शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी प्रतापराव ओहोळ होते. तर व्यासपीठावर आ.डॉ.सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, बाजीराव खेमनर, अ‍ॅड.माधवराव कानवडे, रणजितसिंह देशमुख, इंद्रजित थोरात, लक्ष्मणराव कुटे, आर.बी.रहाणे, गणपतराव सांगळे, शंकर खेमनर, अमित पंडित, कवी बाबासाहेब सौदागर, प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदि मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी ना. थोरात म्हणाले की, आपण जनतेशी व विचारांशी कायम प्रामाणिक राहिलो. सर्व सामान्यांचा सर्वांगीण विकास हाच हेतू ठेवला. चांगल्या कामांना परमेश्‍वराचे आशिर्वाद मिळाले. संगमनेर बद्दल सर्वत्र चांगले बोलले जाते. रायात आज मोठा मान मिळतो आहे. हे सहन होत नसल्याने काही लोक बोलतात. त्यांना महत्व देण्याची गरज नाही. संगमनेर तालुक्यातील जनतेने कायम पाठबळ दिले.नेतृत्वाने विश्‍वास ठेवला. अत्यंत अडचणीत पक्षाची धुरा सांभाळली. आज महाविकास आघाडीत महत्वाचे स्थान आहे. हे जनतेचे श्रेय आहे. आपण कधीही कोणाचे वाईट चिंतले नाही. आपली ती संस्कृती नाही. सातत्याने इतरांना मदत केली. सर्व कारखाने चांगले चालावे व शेतकर्‍यांना मदत व्हावी हा शुध्द हेतू आहे. म्हणून जिल्ह्यातील पुढारी सुध्दा सोबत आहेत.

2013 मध्ये संगमनेर बायपास झाला. काही भाजपच्या मुख्यमंत्र्यांजवळ असणार्‍यांनी शिर्डी - नगर रस्त्याची अवस्था पहावी. संबंधितांनी ती चिंता करावी. संगमनेर हे सहकाराचे आदर्शवत मॉडेल आहे. शेतकरी जिज्ञासू व काटकसरीने प्रपंच करतो. तसा हा संगमनेरचा सहकार आहे. देशात या पॅटर्नची चर्चा आहे.

महाविकास आघाडी सरकारने विनाअट कर्जमुक्ती दिली. कोरोना काळात प्रामाणिक काम केले. मृत्यूचे आकडे लपवले नाही. उलट हिंदुत्वाच्या नावावर मते मागणार्‍यांच्या रायात हिंदुचे मृत्यू देह गंगेकाठी आढळले. उत्तर प्रदेशात शेतकरी चिरडले गेले. देशात भांडवलशाही आणण्याकरिता तीन काळे कायदे लागू केले. अशा लोकांना व त्यांच्या प्रवृत्तींना ओळखा. हा देश गोरगरिब व कष्टकरी शेतकर्‍यांचा आहे. म्हणून पुरोगामी विचारांना पाठबळ द्या. आपण महसूल विभागात अनेक चांगले निर्णय धेतले.डिजिटल सात बारा आला. ई पीक पाहणी सुरु आहे. 2016 पासून ई फेरफार मिळणार आहे. महाराष्ट्राचे हे महसूल मॉडेल देशासाठी आदर्शवत ठरणार आहे. कोरोना काळात सर्व संस्थांसह विशेष यंत्रणा मदतीसाठी काम करत होती.यशोधन मध्ये रात्र दिवस कर्मचारी थांबून तालुक्यासह जिल्हा व रायभर विना प्रसिध्दी मदत केली. गोरगरिबांचे आशीर्वाद मिळाले. हे विकासाचे काम असेच सुरु राहणार असून सर्वांनी दिवाळी आनंदात करा असे सांगतांना तालुक्यातील कार्यक्षेत्रात 14 लाख टन ऊस निर्मिती होईल यासाठी शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करतांना एकरी उत्पादन वाढवा असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले तर सुत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.

--------------------------------------

शेतकरी व कामगारांची दिवाळी आनंदी

यावर्षी कोरोनाचे संकट आहे. सर्वत्र आर्थिक मंदी आहे. मात्र कारखान्याने यावर्षी ही आपली परंपरा जपली असून  दिवाळीत कामगारांना 20 टक्के बोनस तर 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान आणि कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना 200 रुपये प्रतिटन प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. तसेच सभासदांना दिवाळी निमित्त 15 किलो मोफत साखर देण्यात येणार असल्याचे ना.  थोरात यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या