प्रदूषणामुळे मुंबईसह ५० शहरं बुडण्याची भीती

भारत, चीन, इंडोनेशिया, बांगलादेश, व्हिएतनाममधील शहरांचा समावेश 


मुंबई

मानवी क्रियाकलापांमुळे प्रदूषणाचा प्रभाव विशेषत: कार्बन उत्सर्जन शतकांपासून वातावरणात राहतो. ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राची पातळी वाढत आहे. जर कार्बन उत्सर्जन असेच चालू राहिले तर मुंबईसह आशियातील ५० शहरे समुद्राच्या पाण्यात बुडतील. ही ५० शहरे चीन, भारत, इंडोनेशिया, बांगलादेश आणि व्हिएतनामची असतील. एका नवीन अहवालात हा खुलासा करण्यात आला आहे.

चीन, भारत, इंडोनेशिया, बांगलादेश आणि व्हिएतनाम हे कोळशावर चालणारे कारखाने उभारण्यात जागतिक स्तरावर आहेत. या देशांची लोकसंख्याही जास्त आहे. त्यामुळे जागतिक तापमानवाढीचा सर्वात वाईट परिणाम या देशांमध्ये दिसून येईल, अशी भीती शास्त्रज्ञांना वाटते. इतकंच नाहीतर ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिकाला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागेल. तेथील जमिनीचा दहावा भाग समुद्राच्या पाण्यात बुडेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हा अभ्यास अलीकडेच क्लायमेट कंट्रोल नावाच्या साइटवर प्रकाशित झाला आहे. ज्यामध्ये भारतातील मुंबई धोक्यात दाखवण्यात आली आहे. खरंतर, या अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, जगभरात सुमारे १८४ ठिकाणे आहेत. जिथे समुद्राच्या पातळीच्या वाढीचा थेट परिणाम होईल. या शहरांचा मोठा भाग किंवा अगदी संपूर्ण शहरे पाण्यात बुडाली जातील.

या अभ्यासात असे सांगितले गेले आहे की, पुढील २०० वर्ष ते २००० वर्षांच्या दरम्यान पृथ्वीचा नकाशा बदलला असेल. कारण, जर तापमान 1.5 डिग्री सेल्सिअस वरून 3 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढले तर जगभरातील हिमनद्या वितळतील. हिमालयासारख्या पर्वतावरील बर्फ सखल भागात पूर येईल. ज्यामुळे संपूर्ण जगाचा मोठा भाग समुद्राच्या वाढत्या पातळीत शोषला जाईल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या