सोशल मीडिया वरील चीनी बनावटीचे फटाके भारतात आल्याची माहिती चुकीची


नगर प्रतिनिधी 

फटाके हे शिवकाशी तामिळनाडू येथेच बनवून संपूर्ण भारतात विक्रीस जात असल्यामुळे चीन चे कोणतेही फटाके मार्केट मध्ये आलेले नाहीत त्यामुळे नागरिकांनी घाबरून जायचे कारण नाही. फटाके हे फक्त भारतीय बनावटीचेच असल्यामुळे फटाके वाजवून दिवाळी साजरी करा असे आवाहन नगर फटाका व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी एका पत्रकान्वये केली आहे.

 सध्या सोशल मीडिया वर महत्वाची सूचना या शीर्षका खाली गुप्तचरानुसार, पाकिस्तान भारतावर थेट हल्ला करू शकत नसल्याने त्याने भारताकडून बदला घेण्याची मागणी चीनकडे केली आहे. भारतात दमा पसरवण्यासाठी चीनने विशेष प्रकारचे फटाके भरले आहेत, जे कार्बन मोनोऑक्साईड वायूला विषारी आहेत. अश्या प्रकारची माहिती पोस्ट होत आहे. वास्तविक पाहता असे कोणतेही फटाके अहमदनगर जिल्ह्यात अगर इतर कोठेही पाहण्यास मिळाले नाहीत. फटाके हे भारतात फक्त शिवकाशी तामिळनाडू मध्येच मोठया प्रमाणात तयार केले जात असल्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. सदर पोस्ट ही नागरिकांमध्ये भय निर्माण करण्याचे दृषहेतूने व दिवाळी सणावर निर्जन करण्याचे हेतूने काही समाज कंटक पोस्ट करत आहेत. सदरील पोस्ट मुळे नागरिकांबी घाबरून न जाता आपल्या भारतीय संस्कृती व परंपरे प्रमाणे दिवाळी सण हा फटाके वाजवूनच साजरा करावे असे आवाहन दि अहमदनगर फटाका असोसिएशन चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या