मिलिंद तेलतुंबडेचा उल्लेख 'जनयोद्धा'

बदला घेणार : नक्षलवाद्यांकडून सहा राज्यात बंदचे आवाहन


गडचिरोली 

नक्षलवाद्यांनी मिलिंद तेलतुंबडेचा उल्लेख 'जनयोद्धा' असे करत त्याच्या हत्येचा बदला घेणार असल्याचे पत्रक जारी केले आहे. तसेच नक्षलवाद्यांकडून सहा राज्यात बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात गडचिरोली येथे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत नक्षल कमांडर मिलिंद तेलतुंबडे याच्यासह 26 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

नक्षलवाद्यांनी एक परिपत्रक जारी केले असून त्यामध्ये टॉप नक्षलवादी कमांडर मिलिंद तेलतुंबडे याचा उल्लेख 'जनयोद्धा' असं करण्यात आला आहे. गडचिरोलीत झालेल्या नक्षलवाद्यांच्या हत्येचा बदला घेणार असल्याची धमकीही देण्यात आली आहे. तसेच सहा राज्यांत बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

मोठ्या चकमकीनंतर जारी होणाऱ्या पत्रकात पोलिसांना दोष देण्याची असलेली भाषा ताज्या पत्रात नसल्याने यंत्रणांना आश्चर्य वाटत आहे.

भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादीचा केंद्रीय कमिटी प्रवक्ता अभय याच्या नावे पत्रक जारी करण्यात आले आहे. मिलिंद तेलतुंबडे याला जनयोद्धा असे संबोधले असून मृत नक्षल्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सभा आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नक्षल्यांचा बंद महाराष्ट्र- छत्तीसगड- ओडिशा- तेलंगणा-आंध्रप्रदेश राज्यात आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पत्रकात मिलिंद तेलतुंबडे यांनी केलेल्या जंगल आणि शहरी क्षेत्रातील नक्षली आंदोलनाच्या विविध टप्प्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. मिलिंद तेलतुंबडे आणि अन्य नक्षली यांच्या मृत्यूने आंदोलनाची मोठी हानी झाल्याचा उल्लेख देखील करण्यात आला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या