आगामी नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपचा एकतर्फी विजय होईल - राणे



राज्यात सध्या नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. आगामी निवडणुकीत भाजपचा एकतर्फी विजय होईल असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. कोरोनाकाळात झालेले मृत्यू आणि इतर नुकसानाला ठाकरे सरकारच जबाबदार असल्याचेही राणे म्हणाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राणे विरुद्ध ठाकरे संघर्ष दिसून येत आहे

राज्यात सध्या ओबीसी आरक्षणावरून राजकारण तापले असतानाच, ओबीसींच्या खुल्या प्रवर्गात टाकलेल्या जागांसाठी 18 जानेवारीला मतदान होणार आहे. तर इतर 73 टक्के जागांसाठी 21 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे भाजप पूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरणार आहे, आमच्याकडे सेवा आणि माध्यम आहे, त्यामुळे जनता आम्हालाच निवडून देईल अशा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या