सुर्यदर्शन न झाल्याने तापमानात मोठी घट झाली आहे. यामुळे नागरिकांनी भर दुपारी शेकोट्या पेटवल्या आहेत. शहर व तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून शीतलहरी वाहत आहेत. यामुळे तापमानात मोठी घट झाली आहे. दोन दिवसांपासून पूर्णवेळ सुर्यदर्शन होत नसल्याने हुडहुडीत वाढ झाली असून शहर व परिसरात फिरताना थंड हवेच्या ठिकाणी गेल्याचा भास होत आहे. शनिवारी (ता.१५) थोडा वेळासाठी सुर्यदर्शन झाले होते. पण रविवारी तर सुर्यदर्शन झालेच नाही. यामुळे भर दुपारी थंड वाऱ्यामुळे हुडहुडी भरली होती.
0 टिप्पण्या