मुंबईतही महाविद्यालयामध्ये हिजाब घालण्यावर बंदी


मुंबई :
मुंबईच्या महाविद्यालयामध्ये हिजाब घालून प्रवेश करण्यावर बंदी आहे. कर्नाटकामध्ये महाविद्यालयांमध्ये हिजाब घालवण्यावरुन सुरु असलेल्या वादावर देशभरात आंदोलने करण्यात येत आहेत. या प्रकरणावरून महाराष्ट्रातही काही ठिकाणी हिजाब घालण्याचं समर्थन करत आंदोलने करण्यात येत आहेत. राज्य सरकारही हिजाबवरुन सुरु असलेल्या वादावर नजर ठेवून आहे. मात्र मुंबईच्या एका महाविद्यालयामध्ये हिजाब, स्कार्फ घालण्यावर बंदी आहे. मुंबईतील एमएमपी शाह कॉलेजमध्ये हिजाब, स्कार्फ किंवा घुंगटला बंदी आहे.

 मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या माटुंगा येथील एमएमपी शाह कॉलेजमध्ये हिजाब, स्कार्फ आणि बुरखा घालून कॉलेजमध्ये प्रवेश करणाऱ्यांना बंदी आहे. महाविद्यालयाच्या नियमावली पुस्तिकेत यासंदर्भात उल्लेख करण्यात आला आहे. महाविद्यालयाची प्रतिष्ठा राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी योग्य कपडे परिधान करावेत. कॉलेजच्या आवारात बुरखा/घुंगट किंवा स्कार्फ घालण्यास सक्त मनाई आहे, असे कॉलेजने म्हटले आहे. “आम्ही घरात घुसलो तर नागपुरात जाणं मुश्किल होईल,” राऊतांच्या इशाऱ्यावर फडणवीस म्हणाले, “रोज सकाळी ९ वाजता…”

“आमच्या कॉलेजच्या प्रॉस्पेक्टसमध्ये असे लिहिलेल आहे. पूर्वी मुले अशा प्रकारचे कपडे घालून मुलींना त्रास देत होती. ते लक्षात आल्यानंतर मुलींच्या सुरक्षिततेसाठी आम्ही हा नियम लागू केला आहे. या नियमानुसार आम्ही मुलींना वर्गामध्ये बुरखा किंवा घुंगट काढून ठेवण्यास सांगतो. यामागे विद्यार्थ्यांची सुरक्षा हाच मुद्दा आहे. आमच्याकडे मुलींना प्रवेश देताना कोणत्याही धर्म किंवा जातीचा विचार केला जात नाही. सर्व मुलींनी एकसारखे राहून शिक्षण घ्यावे म्हणून बुरखा काढून टाकण्यास सांगितले जाते,” अशी प्रतिक्रिया एमएमपी शाह महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. लीना राजे यांनी लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना दिली.


“गणवेश असेल तर त्याचे..”; हिजाब घालण्याच्या वादावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया


शैक्षणिक संस्थाचे नियम असतील सर्वांनी पाळले पाहिजेत – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

राज्यातही हिजाब प्रकरणाचे पडसाद उमटल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याप्रकरणी भाष्य केले आहे. “आपण शाळेत, कॉलेजमध्ये जातो तेव्हा शिक्षणालाच प्राधान्य दिले पाहिजे. शैक्षणिक संस्थाचे जे नियम असतील ते सर्वांनी पाळले पाहिजेत. माझी सगळ्यांना विनंती आहे की दुसऱ्या राज्यामध्ये घडणऱ्या एखाद्या घटनेवरुन महाराष्ट्रात आंदोलन करुन समाजात अशांतता निर्माण करणे राज्याच्या हिताचे नाही. राजकीय फायद्यासाठी अशा प्रकारचे आंदोलन करणे योग्य नाही. मी सर्वांना आवाहन करतो की शांतता ठेवण्यासाठी प्रयत्न करावा,” असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

शैक्षणिक संस्थांमधील हिजाबवरील बंदी प्रकरण बुधवारी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या व्यापक खंडपीठाकडे पाठवण्यात आले आहे.  त्यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. दुसरीकडे, हिजाबवरून शैक्षणिक संस्थांमध्ये तणाव कायम असल्याने पोलिसांनी बंगळुरुमधील शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात दोन आठवडे आंदोलनबंदी लागू केली आहे.


दरम्यान, बंगळुरुतील शाळा, महाविद्यालये आणि अन्य शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशद्वारापासून २०० मीटरच्या आवारात आंदोलनास पोलिसांनी बंदी घातली आहे. दोन आठवडे ही बंदी लागू राहील. हिजाब प्रकरण चिघळल्याने राज्यातील शाळा-महाविद्यालये तीन दिवस बंद असून, बहुतांश ठिकाणी ऑनलाइन वर्ग सुरु आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या