अवघ्या सहा हजार मूत्रपिंडांचे प्रत्यारोपण

 


 देशात पावणेदोन लाखांहून अधिक रुग्णांचे मूत्रपिंड निकामी झाले असले, तर देशात अद्याप केवळ सहा हजार जणांनाच मूत्रपिंड मिळत असल्याने त्यांचे प्रत्यारोपण होत आहे. त्यांना जीवदान मिळत असले, तरी उर्वरित रुग्ण मूत्रपिंडापासून वंचित असल्याची माहिती समोर आली.

केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. मूत्रपिंड निकामी झालेले रुग्ण देण्यात मोठ्या संख्येने आहेत. त्यातील खूप कमी रुग्णांना नात्यातील योग्य मूत्रपिंड मिळण्याची श्यक्यता असते. अत्यल्प मूत्रपिंड दात्यांमुळे अशा रुग्णांना मूत्रपिंड उपलब्धतेत अडचण येते. यावर उपाय म्हणून मेंदूमृत (ब्रेनडेड) रुग्णाचे अवयवांचे प्रत्यारोपण केले जाते. ब्रेनडेड रुग्णांच्या नातेवाइकांनी अवयवदानाचे महत्त्व समजून घेतल्यास देशातील गरजू रुग्णांना मूत्रपिंड मिळू शकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


'केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, देशात दर वर्षी अंदाजे एक लाख ८० हजार मूत्रपिंडे निकामी झालेल्या रुग्णसंख्येची नोंद होत आहे. त्या तुलनेत दर वर्षी सहा हजार मूत्रपिंड प्रत्यारोपण केले जाते. करोनापूर्वी ही संख्या दहा हजारांपर्यंत होती. मात्र, देशातील मूत्रपिंडे निकामी झालेल्यांसाठी आता एक लाख ७४ हजार मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज भासत आहे. यासाठी ब्रेनडेड रुग्णांचे अवयवदान करावे,' असे आवाहन डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल यूरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. विलास पी. साबळे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या