सातबारवर मोबाईल क्रमांकासह ही नोंदणी आहे आवश्यक





राज्यातील सर्व प्रकारच्या सातबाराधारकांच्या 'सातबारा'वर मोबाईल क्रमांकासह ई-मेलची नोंदणी करण्यात येणार आहे. यामुळे जमीन खरेदी-विक्रीच्या वेळी होणार्‍या गैरव्यवहारास आळा बसणार आहे. संबंधित मालमत्तेवर बँकेच्या कर्जाचा बोजा आहे की नाही, याची माहिती मिळणार असून, संबंधित सातबाराधारकास तलाठी अथवा अधिकार्‍यांना संपर्क साधणे सोपे होणार आहे. राज्यात सुमारे 2 कोटी 56 लाख सातबारा उतारे आहेत. हे सर्व सातबारा ऑनलाइन करण्यात आले आहेत. या सातबार्‍यांवर कोड नंबर, तसेच डिजिटल स्वाक्षरी सही करण्यात आली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे सातबारे विविध शासकीय कामांसाठी आवश्यक बनले आहेत.


असे असले तरी मागील काही वर्षांपासून जमीन खरेदी-विक्री करताना जमिनीबाबत गैरव्यवहार होत असल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यामुळे नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला गेल्याच्या बाबीही उघडकीस आल्या आहेत. याबरोबरच जमिनीवर एखाद्या बँकेचा बोजा असल्यास त्याची माहिती जमीन-विक्रीच्या वेळी समजावी, तसेच अधिकारी अथवा तलाठ्यांना एखाद्या महसूल विभागातील अधिकार्‍यांनी संबंधित सातबाराधारकास संपर्क साधावयाचा असेल, तर सातबार्‍यावर असलेल्या मोबाईल क्रमांक आणि ई-मेलवर संपर्क साधणे सोपे जाणार आहे, तसेच गैरप्रकार रोखण्यास मदत होणार आहे.


शहरी अथवा ग्रामीण भागात नागरिकांच्या सातबारा उतार्‍यावर मोबाईल क्रमांक तसेच ई-मेल नोंदण्यात येणार आहेत. यामुळे जमिनीच्या गैरव्यवहारास आळा बसणार आहे.

– सरिता नरके, समन्वयक, ई-महाभूमी


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या