सहा मुलांचा जीव घेणाऱ्या महिलेने केला पतीवर गुन्हा दाखल



 सहा अपत्ये गमावणाऱ्या महिलेने केला पती विरोधात गुन्हा


रायगड :

रागाच्या भरात आईने स्वतःच्या सहा लहानग्यांना विहीरित टाकून दिले होते. आणि स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, आसपासच्या ग्रामस्थानी तिला बाहेर काढून वाचवले. परंतु तिचे सहाच्या सहा अपत्ये बुडून ठार झाली. 

महाड तालुक्यात एका महिलेने तिच्या सहा मुलांना विहीरीमध्ये ढकलून देवून स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ही धक्कादायक घटना काल घडली.

आता या महिलेने पतीविरोधात, पत्नीचा शारिरीक आणि मानसिक छळ करुन मुलांच्या हत्येस आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही महिला सध्या पोलीस कोठडीत असून तिची चौकशी सुरु आहे.
दारुड्या नवऱ्याकडून तिच्या चारित्र्यावर घेतला जाणारा संशय तसेच तिला शिवीगाळ आणि सतत मारहाण देखील केली जात होती. घटनेच्या आधी नवऱ्याने तू आणि मुले मेलात तरी चालेल, असे सांगत या सर्वांना घराबाहेर काढले होते. घटनेच्या दिवशी ही महिला घरी गेली असता त्याने तिला घरात घेण्यास नकार देत पुन्हा हाकलून दिले होते. त्या नंतरच तिने हे टोकाचे पाऊल उचलले. तिच्या चौकशीतून ही माहिती पुढे आल्यानंतर याच माहितीच्या आधारे या तिची फिर्याद नोंदवण्यात आली आहे.

या फिर्यादीच्या आधारे तिच्या नवऱ्याविरोधात भा.दं. वि. कलम ३०६,४९८ अ , ५११, ३२३ , ३४१ ,५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या