भारत सरकार दोन लाख सैन्य कपात करण्याच्या तयारीत: ‘हे’ आहे कारण


भारत सरकार येत्या दोन ते तीन वर्षात भारतीय सैनिकांची संख्या दोन लाखांनी कमी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती संरक्षण मंत्र्यालयाच्या सुत्रांनी दिली आहे. भारतीय सैन्याचे आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने आणि सैन्याच्या वाढत्या पेंशनवरील भार कमी करण्याच्या उद्देशाने ही सैन्य कपात करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्य येत्या दोन ते तीन वर्षांत १२.७० लाख सैनिकांपैकी सुमारे २ लाख सैन्यकपात करण्याच्या तयारीत आहेत. भारतीय सैन्याला आधुनिक बनवण्याचा सरकारचा उद्देश आहे. मात्र, सैन्यांचे पगार आणि वाढत्या पेंशनमुळे अनेक समस्या उद्भवत असल्याने ही सैन्यकपात करण्यात येणार आहे.

सैन्यावरील वाढत्या पेंशनचा भार कमी करण्यासाठी जून महिन्यात अग्निपथ योजना जाहीर केली होती. मात्र, या योजनेमुळे बराच वाद निर्माण झाला. आधीच कोविडमुळे सैन्य भरती न झाल्याने सैन्याला १ लाख सैनिकांची गरज भासत आहे. तर दरवर्षी ६० हजार सैनिक हे निवृत्त होत आहे. दरम्यान, यावर्षी अग्निथ योजनेंतर्गत सुमारे ३५ ते ४० हजार सैनिकांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या