शरद पवारांच्या बीडमधील सभेनंतर अजितदादांच्या गटातील नेत्याचा माफीनामा

Sharad pawar Amarsinh Pandit
बीड: महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय गोंधळात आता शरद पवारांच्या सभा जास्त गाजतात. पवारांच्या या सभांकडे सामान्य जनतेचे लक्ष लागलेले असते. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार हे दोन गट निर्माण झाले. मात्र, अजित पवार गटातील अनेक नेत्यांना शरद पवारांची भीती वाटत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अलीकडेच बीडमध्ये शरद पवार यांची जंगी सभा झाली होती. या सभेनंतर अजित पवार गटात असलेल्या अमरसिंह पंडित यांनी एक फेसबुक पोस्ट लिहली आहे. पंडितांची ही फेसबुक 
आम्हा भावंडांवर श्री.शिवाजीराव पंडित यांचे संस्कार आहेत, त्यामुळे केवळ तुमचे वय झाले म्हणून नेतृत्व बदल केला असे तोडके विचार आमच्या मनी येणार नाहीत. याबद्दल सार्वजनिक ठिकाणी सोडा परंतु वैयक्तिक सुध्दा कोणाला बोललेलो नाही. तुम्हाला शंभर वर्षे निरामय आयुष्य लाभो हीच सदैव भवानी चरणी प्रार्थना आहे. तुमच्या सोबत अनेक वर्षे निष्ठेने काम करताना अनेक संधी आणि प्रलोभने मिळाली मात्र त्यावेळी कधीही डगमगलो नाही, तुमची साथ सोडली नाही. राजकारणाच्या पलिकडे जावून पवार परिवाराशी शिवछत्र परिवाराचा स्नेहबंध, तो भविष्यातही जपणार आहे.
तुम्ही आणि अजितदादा वेगळे व्हावेत हेच मुळात पटत नाही... असो, राजकीय निर्णय घेताना वैयक्तिक लाभाचा विचार कधीच मनाला शिवला नाही, लाभापायी काही निर्णय घेणार नाही याची खात्री तर तुम्हालाही असेल. बाकी माणुसकी वगैरे जपणारच कारण तुमचेच राजकीय संस्कार आहेत.
- अमरसिंह पंडित


राजकीय जाणकारांच्या मते ही पोस्ट वाचल्यानंतर अमरसिंह पंडित याच्या मनात शरद पवार का अजित पवार यापैकी कोणते नेतृत्त्व निवडायचे, याबाबत अद्यापही गोंधळ असल्याचे दिसत आहे. अमरसिंह पंडितांनी ही भावनिक पोस्ट केल्यानंतर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आला आहे. त्यात अजित पवार गटात अमरसिंह पंडित राहणार की नाही, याच्यावर प्रश्नचिन्ह उभा करत नागरिकांमध्ये मोठी चर्चा रंगलेली पाहायला मिळते. त्यामुळे २७ तारखेला होणाऱ्या अजित पवारांच्या सभेवेळी सभेत नेमकं काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
शरद पवार म्हणाले, "जिल्ह्याच्या नेत्यांना काय झालंय माहिती नाही. एका नेत्याने सांगितलं कोणीतरी आमचा सहकारी पक्ष सोडून गेला. आम्ही चौकशी केली की काय झालं? आजपर्यंत सर्वकाही ठीक होतं. पण असं कळलं की त्यांना अमरसिंह पंडितांनी काहीतरी सांगितलं. काय सांगितलं तर पवार साहेबांचं आता वय झालंय, त्यामुळं आपल्याला भविष्याचा विचार करायचा असेल तर दुसरा नेता निवडला पाहिजे. पण माझं त्यांना एवढचं सांगण आहे माझं वय झालंय असं तुम्ही म्हणता पण तुम्ही माझं काम बघितलं आहे. ज्यांच्यामुळं तुमचं भलं झालं त्यांची थोडी तरी जाणीव ठेवा, अशा शब्दांत शरद पवार यांनी त्यांना सुनावले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या