निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर

लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ५४३ जागांसाठी सात टप्प्यात मतदान होणार आहे. १९ एप्रिलपासून मतदानाला सुरुवात होणार असून ४ जूनला निकाल लागणार आहे.

लोकसभेच्या निवडणुका या सात टप्प्यात होणार आहेत

पहिल्या टप्प्यात -१९ एप्रिल 

दुसऱ्या टप्प्यात - २६ एप्रिल

तिसरा टप्पा - ७ मे 

चौथा टप्पा - १३ मे 

पाचवा टप्पा - २० मे 

सहावा टप्पा - २५ मे

सातवा टप्पा - १ जून

महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. १९ एप्रिलला पहिला तर २० मे रोजी शेवटचा टप्पा असेल

पहिला टप्पा -१९ एप्रिल नागपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर

दुसरा टप्पा - २६ एप्रिल- बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा - ७ मे रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणगंले

चौथा टप्पा - १३ मे - नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ,पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा -२० मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, दक्षिण मुंबई, वेस्ट दक्षिण मुंबई, पूर्व मुंबई, मध्य उत्तर मुंबई, मध्य दक्षिण मुंबई, दक्षिण मुंबई.

निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर देशभरात आजपासूनच आचार संहिता लागू झाली आहे.निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांच्या जोर बैठकांना अधिकच जोर येणार आहे. राजकीय समीकरणांचीही जुळवाजुळव जोरात होणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या