भारताने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली, शेवटच्या दोन षटकांत सामना फिरवला, पाकिस्तानचा सहा धावांनी पराभव केला.

T20 विश्वचषक 2024 च्या 19 व्या सामन्यात भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होत होता. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 119 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 113 धावाच करू शकला.

भारताने रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा सहा धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 19 षटकांत 119 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ मजबूत स्थितीत दिसत होता. एकवेळ 14व्या षटकात पाकिस्तानची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 80 धावा होती. यानंतर सामन्याला कलाटणी मिळाली. रिझवान-शादाब बाद झाले आहेत. जसप्रीत बुमराह 19व्या षटकात गोलंदाजीला आला आणि त्याने केवळ तीन धावा देत इफ्तिखारची विकेट घेतली. 20 व्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी 18 धावांची गरज होती. मात्र, अर्शदीपने केवळ 11 धावा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या