निलंबन कारावाई मागे घेतल्यानंतर अंबादास दानवे काय म्हणाले?
निलंबन कारावाई मागे घेतल्यानंतर अंबादास दानवे म्हणाले, मला असं वाटतं की, निलंबन मागे घेण्यात आले. त्याला उशीर त्यांनी केला आहे. हा निलंबनाचा निर्णय मागे घेऊन खूप काही असं वेगळं त्यांनी केलं असं नाही . मी दिलगिरी व्यक्त केली होती त्यानंतर त्यांनी निलंबन मागे घ्यायला हवं होतं. तरी त्यांनी तीन दिवस यामध्ये घेतले .उद्यापासून मी सभागृहात जाईल, तसेही आता चार ते पाच दिवस उरले आहेत. मला जरी तीन दिवस सभागृहात येऊ दिलं नाही तरी मी माझा जनता दरबार सुरू ठेवला. उद्यापासून मी त्याच आक्रमकतेने विरोधी पक्षाची भूमिका मांडत राहणार आहे.
0 टिप्पण्या